आदिवासी जागा होतोय...
आदिवासी जागा होतोय... रमेशायण 'रोटी, कपडा और मकान' ही माणसाची मुलभूत गरज स्वातंत्र्यानंतरही आदिवासी समाजाच्या पदरात पडलेली नाही. १९३०मध्ये नाशिकच्या चणकापूर परिसरात आपल्या मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी आदिवासींनी इंग्रजांविरूद्ध दीड दिवसांचं आंदोलन केलं. त्यात असंख्य आदिवासींना आपले प्राण गमवावे लागले. तर ८३ वर्षांनंतर 'रोटी, कपडा और मकान' या मागण्यांसाठी चणकापूरजवळ ११ व १२ एप्रिलला गुजरात महामार्ग दीड दिवस आंदोलन करून अडवण्यात आला. सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आदिवासी जागा होतोय हेच खरं... स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे योगदान म्हणजेच कळवण तालुक्यातील चणकापूरचा अजरामर लढा. आज तो अनेकांच्या स्मरणातही नसेल. यावर कधी पुस्तक लिहिलं अथवा एखादा धडा न आल्याने म्हणा आपल्याला त्याचं विस्मरण झालं आहे. १९३०मध्ये झालेला चणकापूरचा दीड दिवसांचा लढा आज आठवायचं कारण म्हणजे कळवण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून आदिवासींनी वनहक्क, रोजगार व महागाई या कारणांनी एल्गार पुकारलाय. त्यामुळेच आदिवासींच्या चणकापूर लढ्याची आठवण पुन्हा ताजी झाली. चणकापूरचा तो लढा आणि गुजरात महामार्ग तब्बल