गरज वारसा सर्वेक्षणाची!
गरज वारसा सर्वेक्षणाची!
नाशिक एक ऐतिहासिक संस्कृती पुढे घेऊन जाणारं गाव आहे. येथील समृद्ध सांस्कृतिक ऋणानुबंधाला लोकसंस्कृतीचे कोंदण लाभले आहे. येथील प्रत्येक वारसा प्रत्येक श्वासातून समूहमनाचा ठेका घेताना दिसतो. प्रत्येक वारशामध्ये संस्कारसक्षम स्पर्श अनुभवता येतो. हा वारसा जपण्यासाठी तो नेमका कुठे, कसा जगतो आहे, हे शोधायलाच हवे. म्हणून गरज आहे वारसा सर्वेक्षणाची.
रमेश पडवळ
8380098107
Ramesh.padwal@timesgroup.com
8380098107
Ramesh.padwal@timesgroup.com
मानवी संस्कृतीच्या विकासात वारसा निर्मितीला महत्त्वाचे स्थान आहे. जगण्याच्या सजगतेतून प्रथा, परंपरांचा जन्म झाला. आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे, त्याच्या नोंदी गुफांमध्ये चित्रांच्या माध्यमातून रेखाटला गेला. शिकार, शेती, लग्न, मिरवणुका, लढाईचे प्रसंग हजारो वर्षांपासून जपलले आपण पाहतो. वारसा विकासालाही टप्पे होते, असे म्हंटले तर वावगे ठरू नये. गुफांमधील ही चित्र पुढे मूर्ती कलेतून दिसू लागली. भाषा, लिपी विकसित होऊ लागली अन् चित्रांच्या जागी रेषांनी आकारलेली लिपीही एक वारसा ठरली. निसर्गाकडून माणूस देव या संकल्पनेकडे वळाला. मूर्तीपूजा जसजशी विकसित झाली तसतशी
लेणी, मंदिरे आकाराला येऊ लागले. भाषाही दरम्यानच्या काळात बोलकी होऊ झाली. वस्ती करून राहू लागलेला माणूस आपल्या पाऊलखुणा सिंधू-सरस्वती संस्कृतीसारख्या स्थळांतून अगदी नाशिक-जोर्वे सारख्या स्थळांपर्यंत पुढच्या पिढ्यांसाठी वारसा म्हणून उभ्या ठाकल्या. उत्खननातून आता या पाऊलखुणा समोर आल्याने मानवी संस्कृती कधी अन् कशी बहरली हे समोर आले आहे. ही स्थळे आपला वारसा ठरू लागली आहेत. पण माणूस येथेच थांबला नव्हता. त्याने प्रगतीची कास कधी सोडली नाही. राहण्यासाठी घरे, जगणे सोपे करण्यासाठी वेगवान हत्यारे, गरजेची भांडी, जगण्यासाठी अन् मेल्यानंतर काय या नीतीमूल्यांची ठेवण सुरू केली. पंथ, धर्म, सत्तेतील जयविजय, आक्रमण, सत्तांतर, व्यापार हे बदल जसजसे मानवाने स्वीकारले तसतशी त्याच्या जगण्यातील बदलही पुढे आले. बदलाचे आव्हानही त्याने स्वीकारले अन् लेणी, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, वाडे, नदी, लोकसंस्कृती, सणउत्सव, प्रथा, परंपरा, चित्रकला, काष्ठशिल्प, देवदेवतांची शिल्पे, लोककला, लोककथा, अख्यायिका, गीते, संस्कार हे सर्वकाही त्याने अन् आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवले. बदलत्या काळानुसार यातील अनेक वारसास्थळे (स्थळ म्हणजे फक्त वास्तू नव्हे; लोकपरंपरा, प्रथा देखील.) लोप वापली, काही नव्याने निर्माण झाली तर अनेक वारसास्थळे लोप वापण्याच्या स्थितीत आहेत. या लोप वापत असलेल्या दृश्य अन् अदृश्य वारसा स्थळांचे जिल्ह्यानुसार सर्वेक्षण होणे व त्यावर चिंतन होणे आवश्यक आहे. असे न झाल्यास हा वारसा हातातून निसटेल ही भीती कायम आहे. फक्त पुरातत्त्व विभाग सर्वच वारसा स्थळांचे संवर्धन करण्यात सक्षम नाही. त्यामुळे आपला वारसा लोकांनीच जपायला हवा, यासाठी एक मोठी चळवळ उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र यासाठी नेमक्या कोणत्या पद्धतीने कामाला सुरूवात झाली पाहिजे. याबाबत मार्गदर्शन व जिल्ह्यातील वारसास्थळांचे सर्वेक्षणाचा गोवर्धन पर्वत पुरातत्त्व व गॅझेटिअर या दोन विभागांनी उचलायला हवा. या दोन विभागांवर जबाबदारी टाकण्यात अथवा त्यांच्याकडून अपेक्षा करण्याच कारणही तसं आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या संचालकपदी असलेले तेजस गर्गे अन् गॅझेटिअर विभागाच्या कार्यकारी संपादक व सचिवपदी असलेले डॉ. दिलीप बलसेकर हे दोघेही नाशिककर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही खूप आहेत. वारसा संवर्धन क्षेत्रात चांगले काम अपेक्षित असेल तर त्यांना नाशिककरांनीही योग्य साथ द्यायला हवी अन् या विभागांना लोकसहभाग आवश्यक असेल तर वारसा सर्वेक्षण, संवर्धन, जतनाची कामे कशी केली जातात याचे प्रशिक्षण त्यांनी नाशिककरांना द्यायला हवे. तरच वारसा जतन अन् संवर्धनाच्या विकासवाट अधिक समृद्ध अन् सोप्या होतील. मात्र, यापूर्वी गरज आहे ती आपल्या जिल्ह्यात नोंदविल्या न गेलेल्या गावागावांतील वारसा स्थळांच्या सर्वेक्षणाची. अशा सर्वेक्षणातूनच एकमेकांतील दूरावा दूर करून संवाद निर्माण करता येईल.
वारसा म्हणजेच हेरिटेजबाबत लोकांमध्ये जनजागृती होत आहे. जुनं ते सोनं याचही महत्त्व लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. त्यामुळे आपण आता जतन, संवर्धन प्रक्रियेकडे वळायला हवं. मात्र वारसा स्थळांचं जतन-संवर्धनापूर्वी गावागावांतील वारसा नेमका काय आहे, कोणत्या स्थितीत आहे यावर मंथन व्हायला हवं. ऐतिहासिक, सांस्कृतिक व कलात्मक वारसा शोधणं, मिळणं ही सर्वेक्षणाच्या पातळीवर पहिली मोहीम. या वारशाची नोंद घेणे ही दुसरी पायरी. तर मिळालेल्या वारशाचे विश्लेषण, त्याची स्थिती अन् त्यासाठी काय करता येर्इल ही वारसा संवर्धन आणि जतनची शेवटची पायरी ठरते. उदाहरणच द्यायचे झाले तर गोदाकाठी पूर्वी चित्रकथी नावाची एक लोककला सादर व्हायची. ही आता फक्त कोकणात दिसते. गोदाकाठी कागदावर, कापडावर काढलेल्या चित्रांच्या मदतीने त्या चित्रांचे वर्णन गीतातून केले जायचे. रामायण, महाभारत, अनेक अख्यायिकांचे हे हक्काचे ठिकाण होते. जनजागृतीचे संदेशही या चित्रकथीतून दिले जायचे मात्र आता ही लोककला नामशेष झाली आहे. अशीच आणखी एक लोककला म्हणजे बोहाडे. गावागावांतील उत्सवांमधून सादर होणारे बोहाडे, आखाडी आता बंद होऊ लागले आहेत. बोहाड्यांना दारूची लागण झाल्याने या कार्यक्रमांमधून होणारा वाद नको म्हणून हा लोककला प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर काही गावांनी हा वारसा काळजाशी जपला आहे. या महत्त्वाच्या घटनेची नोंद मात्र ना पुरातत्त्व विभागाने घेतली आहे ना गॅझेटिअर विभागाने. कॉर्पोरेट संस्था प्रदर्शनापुरत्याच लोककलांचा आधार घेताना दिसतात. पण ठोस काम त्या करताना दिसत नाहीत. अशाच उपेक्षेतून बोहाडे ही परंपरा बंद होत आहे.
बोहाडे लोककलेचा एक भाग असूनही लोककथा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फक्त लोककलाच नाही तर या लोककलेवर विसंबून असलेले कलाकारही विवंचना सहन करीत जगत आहेत. सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेले उपक्रमही ढेपाळले आहेत. हरसूल येथे मुखवट्यांचे संग्रहालय उभारण्यात आले. पण, दुर्लक्ष अन् इच्छाशक्तीच्या अभावामुळे सर्वकाही कुलपात पडून आहे. उत्साहाच्या भरात लाखो रूपये खर्च करून उपक्रमांचे काय होते हे हरसूलचे उदाहरण ताजे आहे. बोहाडे परंपरा अन् त्यांच्या मुखवट्यांना लोकाश्रय अन् सरकारचा आश्रय मिळाला तर लोककलेचे जतन अन् संवर्धन होर्इल. शिवाय, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही वेग येर्इल. अशीच तऱ्हा आहे आदिवासी लोककला, कलाकार अन् प्रथा, परंपरांची. राष्ट्रीय पातळीवर वाद्य वाजवणारे कलाकार नाशिकमध्ये आहेत. मात्र त्यांना राजाश्रय नसल्याने त्यांची कला नामशेष होण्याच्या स्थितीत आहे. सध्या अनेक कलाकार मोलमजुरी करून जीवन कंठत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध तारपा वादक हरी दत्ता चारस्कर. हा कलाकार वारसा नाही का? त्यांना जपण्यासाठी प्रयत्न करायला नकोत का? त्यांची कला पुढच्या पिढ्यांकडे जाऊ शकेल, असे वारसा लोककला विद्यापीठ नाशिकमध्ये उभे राहू शकत नाही का? या प्रश्नांची उत्तरं फक्त विचारमंथन करून मिळणार नाहीत. कारण, जागेवरून बसून मंथन करण्यापलीकडे म्हणजे नाशिकचा नेमका वारसा काय आहे अन् तो जपण्यासाठी काय करायला हवे यावर आता फिल्डवर्क या ठोस उपाययोजनेची गरज आहे.
नाशिकमधील प्राचीन मंदिरांची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. हा वारसा जपला जावा असे कोणालाही वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. याचा फायदा एखादा नेता, अँटिक वस्तूंचा एजंट घेताना दिसतो. गावात नवीन मंदिर बांधून देतो म्हणून गावातील जुन्या मंदिरातील शिल्प ट्रक भरून घेऊन गेल्याची उदाहरणे नाशिकमध्ये कमी नाहीत. यास आपली मानसिकताही तितकीच कारणीभूत आहे. मंदिर भग्न झालं, शिल्प भंगली म्हणजे अनिष्ट काही होर्इल, या भीतीने अनेक गावकऱ्यांनी ही प्राचीन शिल्प, मूर्ती चक्क ट्रक भरून समुद्रात नाहीतर नदीत सोडून दिल्याची उदाहरणेही नाशिकमध्ये सापडतात. अशा एजंटांना रोखण्यासाठी आपल्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. कायदा आहे पण कोणी तक्रार करीत नाही, तोपर्यंत हा कायदा कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही. या सगळ्यामुळेच वारसा अज्ञात आहे अन् नष्ट होण्याच्या स्थितीत आला आहे.
वीरगळ, प्राचीन मंदिरे, इतिहास, मंदिरांवरील चित्र, प्राचीन मठ, पेशवेकालीन वाडे, वीरगळी, आदिवासींचे चिरे, बारवा, यादवकालीन विहीरी, ऐतिहासीक जलयोजना, नदीवरील घाट, शिलालेख, ताम्रपट, पोथ्या, जुनी कागपत्रे असा अन् खुपसा वारसा जपण्यासाठी जोपर्यंत गावागावातून सर्वेक्षण करून याच्या नोंदी होत नाहीत. तोपर्यंत आपल्या अवतीभवती वारसा आहे, तो जपला पाहिजे अन् त्यातूनही आपल्या गावाचा विकास होऊ शकतो ही भावना ग्रामस्थांमध्ये जोपर्यंत रूजविण्यासाठी प्रयत्न होत नाही, तोपर्यंत सगळे प्रयत्न निरर्थक ठरतील. पुरातत्त्व अन् गॅझेटिअर या दोन विभागांना लोकाभिमुख व्हायचे असेल तर त्यांनी त्याची सुरूवात अशा सर्वेक्षणातून करायला हवी. तरच लोकांना त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होर्इल. यातून या चळवळीला लोक पाठिंबा, सहभाग मिळेल अन् वारसा जनतसंवर्धनाचा श्रीगणेशाही होर्इल.\
रमेश पडवळ
8380098107
रमेश पडवळ
8380098107
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा